पांढर

pages: 
340
price: 
300 रु.
ISBN: 
978-81-7432-054-4
Edition: 
पहिली
Cover Page: 

`पांढर’ या कादंबरीचं केंद्र दुष्काळ आहे. सधन असलेले गावखेडं एकविसाव्या शतकात निर्धन होऊन शेवटचा श्र्वास घेत असल्याचं चित्रण रवींद्र शोभणे यांनी या कादंबरीत केलेलं आहे. गावखेडं हे या आशयाचं वर्तुळ आहे. गावगाड्यातल्या मानुषतेचं विशाल दर्शन यातून घडतं.
एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच ग्लोबलायझेशनच्या प्रगतीचा मुखवटा भेसूर असल्याची जाणीव सर्वप्रथम कृषिव्यवस्थेला झाली. पर्यायानं ग्लोबलायझेशननं गावगाड्याच्या नैसर्गिक जीवनाचा विनाश करून कृषिव्यवस्थेच्या आर्थिक नाड्यांमधलं रक्तच शोषून घेतलं. त्यामुळे कृषिवलांचंच जीवन उजाड झालं असं नाही, तर भुईचंही सृजनशीलत्व नष्ट होऊ लागलं. कृषिवलांची ही अगतिकता अस्मानी संकटांनी ओढवली.
वाचकांना सुन्न करणारा अनुभव `पांढर’ मधून व्यक्त होतो. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातलं पांढरीचं-भूमीचं हे असं जीवघेणं वास्तव `पांढर’च्या निमित्तानं पहिल्यांदाच मराठी कादबंरीत जोरकसपणे व्यक्त झालं आहे.
रवींद्र शोभणेंसारखे संवेदनशील लेखक आपल्या परिसरातल्या ह्या वास्तवाने हेलावून जातात. हे त्यांच्या मनात असलेल्या गावखेड्याविषयीच्या आत्मीयतेचं लक्षण मानावं लागेल.
डॉ. किशोर सानप

Rate this post Not rated
( categories: )